व्हीएसआरएस पिंपरी न्युज भाजप सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांवर केलेले आरोप म्हणजे उलटा चोर, कोतवाल को डांटे’ असाच आहे, असा आरोप कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केला आहे.
महापौर माई ढोरे यांनी पत्रकार परिषद घेत आयुक्त राजेश पाटील विकासकामांना अडथळा निर्माण करतात, असे आरोप केले. याबाबत कदम म्हणाले, वास्तविक पाहता महापौरांचे तसेच शहरातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आयुक्तांवरील रोषाचे कारण वेगळेच आहे. पण आत्ता ते वेगळेच कारण पुढे करत आयुक्तांना लक्ष करत आहेत.
शहरातील जनता सुज्ञ आहे. जनतेने भाजपाच्या नेतृत्वाखाली महापालिकेत गेल्या साडेचार वर्षांपासून झालेला गैरव्यवहार पाहिला आहे. शास्ती कराच्या नावाने दिलेली खोटी आश्वासने पाहिली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सुरू असलेली लूट अनुभवली आहे. कृत्रिम पाणी टंचाई व टॅंकरराज ही साखळी, शिक्षण मंडळातील चुकीची खरेदी, एफडीआर घोटाळा, लाचलुचपत विभागाची धाड व रंगेहात पकडलेले पदाधिकारी आदींसह इतरही अनेक अनियोजित घटनांबाबत महापौर का बोलत नाही? असा सवाल डॉ कदमा यांनी केला.
Discussion about this post