व्हीएसआरएस न्युज-भोसरी/कुदळवाडी(प्रतिनिधी):- शासन सेवेतील सफाई कामगार हा शेवटचा घटक आहे. सफाई कामगार स्वतःचे आरोग्य धोक्यात घालून पूर्ण समाजाचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ते काम करत असतात.
त्यांनाही आता समाजात सन्मानाची वागणूक दिली पाहिजे अशी भावना स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी व्यक्त केली. दिनेश यादव युवा मंच वतीने सफाई, आरोग्य व विद्युत कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
कोरोनायुद्धात लढणारा आघाडीवरचा सैनिक सफाई कामगारदेखील आहे. त्यांनी जर यावेळी सेवा बंद केली असती, तर घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन रोगराईने सर्व समाज पिडला गेला असता. हे सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून अत्यंत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठतेने सर्व ठिकाणी आपले काम करीत आहेत. त्यांच्याविषयी विवेकानंद एकदा म्हणाले होते की, “कलकत्ता शहरातील सफाई कामगारांनी संप केला, तर काय गोंधळ उडेल, याची आपण कल्पनाच न केलेली बरी!” विवेकानंदांना सांगायचे आहे की, ज्यांना आपण हिन समजतो ती समाजाची फार मोठी शक्ती आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करणे हे महापाप आहे अशी भावना यावेळी यादव यांनी व्यक्त केली.
Discussion about this post