व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी:- भक्ती सोपान पुलावर नागरिकांच्या सुरक्षतेसाठी नागरिक ये – -जा करताना पुलावरून एखादा अनुचित प्रकार,दुर्घटना घडू नये या करिता नव्याने संरक्षण लोखंडी पाईप दुतर्फा बसवण्यात आले होते.ते इंद्रायणी नदीच्या वाढत्या पाण्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत. मावळ भागात काही दिवस संततधार व सद्यस्थितीत मुसळधार पावसामुळे धरण्यांच्या, नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
आळंदी येथील इंद्रायणी घाटावरील अर्धा दगडी घाट परिसर पाण्याखाली असून,भक्त पुंडलिक मंदिर अर्ध्याच्या वर पाण्याखाली आहे.भक्ती सोपान पूल गेले ५ दिवस पाण्याखालीच आहे.
नदीघाटा वर जाऊ नये या करिता
पालिका प्रशासनाने सूचना फलक लावले आहेत. नगरपालिका चौक,इंद्रायणी घाट परिसरात विविध ठिकाणी परिसरात बांबू पत्रे लावण्यात आले आहेत.
इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना काल दि.१२ रोजी प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.लोणावळा धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस लक्षात घेता पुढील ४८ तासात धरणातून नदीपात्रात पाण्याच्या विसर्गास सुरुवात होण्याची शक्यता असल्याने इंदायणी नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
लोणावळा धरणात जलाशय पातळी ६२३.९८ मीटर झाली असून पाणीसाठा ७.११ द.ल.घ.मी. (६०.७४ टक्के) आहे. विसर्ग टाळण्यासाठी जास्तीत-जास्त पाणी पश्चिमेकडे वळवून खोपोली वीजगृहातून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. तथापि, पाण्याच्या विसर्गाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी इंद्रायणी नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. नदीपात्रामध्ये जनावरे, शेत पंप, अवजारे व इतर साहित्य तात्काळ काढून घ्यावे असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post