Pimpri News : पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची आगामी ४० वर्षांत होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी भाजपा सत्ताकाळात प्रकल्प हाती घेण्यात आले. त्याअंतर्गत चिखली येथे १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वयीत झाला असून, त्याद्वारे समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
आता चिखली येथील प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू करावी. आगामी काळात होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी भूमिका घेत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता. याबाबत महिनाभरापूर्वी आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर आयुक्तांनी शुक्रवारी मंजुरी देवून महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावला आहे.
Discussion about this post