मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मागणी मान्य करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.
रमेश बैस हे सध्या झारखंडचे १० राज्यपाल होते. ते मूळचे रायपूरचे आहेत. ते रायपूरमधून ७ वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री म्हणून काम केलेलं आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी सुमित्रा महाजन, ओम माथूर यांच्या नावाची चर्चा सुरू होती.
महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही, असं राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतात म्हटलं आहे.
Ramesh Bais appointed as the new Governor of Maharashtra; President of India has accepted the resignation of Bhagat Singh Koshyari as Governor of Maharashtra. pic.twitter.com/9mco3tSTkI
— ANI (@ANI) February 12, 2023
Discussion about this post