व्हीएसआरएस मराठी न्युज –29 ऑगस्ट म्हणजेच मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय भवनात विविध खेळामध्ये पारंगत असलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिला जातो.
मेजर ध्यानचंद सिंह यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या करिअरमध्ये 400हून अधिक गोल केले आहेत.
- 29 ऑगस्ट 1905 रोजी प्रयागराज उत्तर प्रदेश येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला.
- मेजर ध्यानचंद यांनी 1922 मध्ये भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा केली.
- 1956साली भारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झाले.
- मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये केलेल्या पराक्रमामुळे त्यांना ‘हॉकीचा जादूगार’ ही पदवी देण्यात आली.
- 1928, 1932 आणि 1936 साली उन्हाळी ऑलिंपिकमध्ये मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलिम्पिक सुवर्णपदकांची पहिली हॅटट्रिक मिळवून देण्यात महत्ताची भूमिका बजावली.
- 1956मध्ये त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.
- त्यांच्या निधनानंतर भरतीय टपाल विभागाने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट बनविले. तसेच दिल्ली नॅशनल स्टेडियमचे नाव मेजर ध्यानचंद स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.
भारत सरकारने 2012मध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी राष्ट्रीय भवनात विविध खेळामध्ये पारंगत असलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिला जातो.
Discussion about this post