व्हीएसआरएस न्युज केंद्र सरकारने शेतकऱयासोबतची चर्चा पूर्णपणे थांबवलेली आहे. त्यामुळे शेतकऱयांच्यावतीने मोदी सरकारला एक पत्र पाठवून शेतकऱयांच्या मागण्यांवर चर्चा सुरू करावी अशी मागणी केल्याचेही राजेवाल यांनी सांगितले.
दरम्यान शेतकरी आंदोलनाला बुधवार 26 मे रोजी सहा महिने पूर्ण होत असून त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही सात वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.
कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. सरकारने शेतकऱयांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन तीव्र करण्यासाठी जमवाजमव सुरू केल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या दिवशी शेतकरी गावागावात घरावर, दुकानावर काळे झेंडे लावून सरकारचा निषेध करणार आहेत. तसेच बौद्ध धर्माचे नेते बुधवारी आंदोलन स्थळी उपस्थित राहून शेतकऱयांना मार्गदर्शन करणार आहेत.
मोदी सरकारच्या गेल्या सात वर्षाच्या काळात देशाची वाट लागली आहे. अर्थव्यवस्थेची सातत्याने घसरण सुरू आहे. बेरोजगारी वाढत चालली आहे. मात्र सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याची टीका राजेवाल यांनी केली.