नवी दिल्ली : बागेश्वरधामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री तथा बागेश्वरधाम सरकार यांच्याकडे खंडणीची मागणी करून ती न दिल्यास ठार मारण्याची धमकी देणा-या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
आकाशकुमार असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.त्याला छतरपूर पोलिसांनी पटण्यातील कंकरबाग परिसरात असलेल्या द्वारका कॉलेजमधून त्याला अटक करण्यात आली.
बागेश्वरधामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्याकडे ई मेलद्वारे १० लाख रुपयांची खंडणी लॉरेन्स बिश्णोई टोळीच्या नावे मागण्यात आली होती. दोन तीन वेळा असे मेल आल्यानंतर पोलिसांनी इंटरपोलची मदत घेत आरोपीचा शोध घेतला. आणि, त्याला अटक केली. आरोपी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील असून त्याने अॅपच्या माध्यमातून हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.
Discussion about this post