व्हीएसआरएस न्युज आकुर्डी -दत्तवाडी येथील जगदगुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रवेशद्वार कमानी वरील बरेचशे एलईडी लाईट बऱ्याच दिवसांपासुन बंद आहेत,
सर्व एलईडी दिवे दुरुस्त करून लावण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निखिल दळवी यांनी अ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय मुख्य क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,प्रभाग क्रमांक 14 मधील आकुर्डी दत्तवाडी येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी प्रवेश द्वार आहे. या प्रवेशद्वाराच्या कमानीवर बाहेर एलईडी लाईट बंद पडल्या आहेत व कमानीच्या नावावरील लाईट देखील बंद पडल्या आहेत. त्यामुळे कमानीवरील नाव रात्रीच्यावेळी दिसून येत नाही. कमानीवरील संत तुकाराम महाराज वारकरी यांचे चित्र लावलेले आहेत ते सुद्धा दिसत नाही कमानीवरील ला लवकरात लवकर दुरुस्त करून चालू करावे याबाबत मागणी केलेली आहे.