मुंबई : महाराष्ट्रात रविवारी १२ हजार ४०५ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यातील १३१ रुग्णांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना संसर्गाचा हा दर १.०५ टक्के इतका आहे.रविवारी कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही असे राज्याच्या आरोग्य खात्याने सांगितले आहे. शनिवारी राज्यात १७२ रुग्ण आढळले होते.
रविवारी कोरोनामधून बर्या झालेल्या ५१ रुग्णांना घरी पाठविण्यात आले.राज्यात रविवारपर्यंत जे एन १ प्रकारचे २९ आढळले आहेत. यापैकी १५ पुण्यात, ५ ठाण्यात, ३ बीडमध्ये, २ छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि कोल्हापूर, अकोला, सिंधुदुर्ग, नाशिक येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
१ जानेवारी २०२३ पासून राज्यात कोविडमुळे १३७ मृत्यू झाले असून यापैकी ७०.८० टक्के मृत्यू ६० पेक्षा जास्त वयाच्या रुग्णांचे झाले आहेत. तर यातील ८४ टक्के व्यक्तींना मधुमेह,हृदयविकार यासारखे आजार होते. १६ टक्के रुग्णांना कोणताही आजार नसताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
Discussion about this post