व्हीएसआरएस मराठी न्युज –टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 45.5 ओव्हरमध्ये 218 धावांवर गुंडाळलं.
दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक 81 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांसमोर टोनी डी झोर्झीशिवाय एकालाही टिकता आलं नाही. अर्शदीप सिंह, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा, हे तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर इतरांनीही चांगलं योगदान दिलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-1 ने जिंकली आहे.
Discussion about this post