व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पवना नदीत सध्यस्थितीत गढूळ पाणी येत असून नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहन महापालिका पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.
पवना नदीत येणाऱ्या पाण्यात गढूळपणा वाढला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने पाणी शुद्ध केले जात आहे. हे पाणी पिण्यासाठी पुर्णपणे योग्य आहे. त्यानंतरही नागरिकांनी पाणी वापरण्यापूर्वी उकळून आणि गाळून घ्यावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले. दरम्यान, पवना धरणात 81,23 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
जंतू हा शब्द वापरण्यापेक्षा आपण जीवाणू हा शब्द वापरू.
उकळते पाणी म्हणजे १०० अंश सेल्सिअस तापमानाचे पाणी. काही जीवाणू असे असतात की जे अगदी उकळत्या पाण्यातसुद्धा व्यवस्थित जिवंत राहतात. त्याच प्रमाणे काही जीवाणू असे असतात की जे अगदी शून्य अंश सेल्सिअस तापमानाच्या पाण्यात सुद्धा जिवंत राहतात. सामान्य तापमानाशी तुलना करता त्यांची संख्या अशा तीव्र तापमानात वाढत नाही इतकेच परंतू काही जीवाणू मात्र मरत नाहीत. पाणी उकळून प्यायल्याने त्यातील किती टक्के जीवाणू नष्ट होतात हे सांगता येणार नाही कारण मुळात पाणी उकळण्यापूर्वी किती आणि कोणते जीवाणू होते यावर ते सर्व अवलंबून आहे.
Discussion about this post