(व्हीएसआरएस न्यूज) | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. यातील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत. तर तिसऱ्या कसोटीत भारताला पराभूत व्हावे लागले होते. अशात आता चौथ्या मालिकेत भारताचा फलंदादी विराट कोहलीने क्रिकेट कारकीर्दीतील ७५ वे शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, भारताने ४०० धावांचा टप्पाही पार केला आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथा आणि शेवटचा सामना सुरू आहे. आज चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलिया संघाने भारतापुढे ४८० धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने दमदार शतक झळकावले आहे. तर विराट कोहलीनेही शतक केले आहे. विराटचे हे कसोटीतील २८ शतक आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने ४८० धावांचा मोठा डोंगर उभारला. त्याच्या प्रतिउत्तरात भारतानेही चांगली सुरूवात केली. भारताकडून शुभमन गिलने १२८ तर विराट कोहली दमदार शतक ठोकले त्याशिवाय रवींद्र जडेजाने २८, रोहित शर्माने ३५, चेतेश्वर पुजाराने ४२ आणि श्रीकर भरतने ४४ धावा केल्या आहेत.
Discussion about this post