व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
दि.३० शनिवार रोजी आळंदी पोलीस स्टेशन ने आळंदी मस्जिद मध्ये इफ्तार पार्टी आयोजन केले होते.सध्या रमजान महिना चालू असल्याने मुस्लिम समाजाचा उपवास असतो.आळंदी पोलीस ठाणे तर्फे
मशिदी मध्ये फळाहार वाटण्यात आला होता.वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे,पो.आधिकारी मच्छिंद्र शेंडे हे या ठिकाणी उपस्थित होते.
या इफ्तार पार्टी च्या वेळेस आळंदी पोलीस ठाणे,राष्ट्रवादी काँग्रेस मान्यवर नेते,शिवसेनेचे नेते,मनसे पदाधिकारी,आळंदी दक्षता फाउंडेशन सदस्य,आळंदी ग्रामस्थ, मुस्लिम बांधव व पत्रकार मंडळी एकत्र येत फळाहाराचा आस्वाद घेतला.
गावात सर्व धर्म समभाव हा नेहमीच मूलमंत्र राहिला असून गावातल्या विविध समाजातील नागरिकांमध्ये एकोपा,एकता , प्रेम, आपुलकी ही नेहमीच दिसून येते.
सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे गरजेचे आहे.सर्वं धर्मामध्ये समानतेची जाणीव करून आपापसातील बंधूभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Discussion about this post